सतत तोट्यात असणा-या शेतक-यांना शेतीत गांजा लागवड व किडणी विकी करण्याची रितसर परवानगी देणेबाबत निवेदन सादर

सतत तोट्यात असणा-या शेतक-यांना शेतीत गांजा लागवड व किडणी विकी करण्याची रितसर परवानगी देणेबाबत निवेदन सादर 

राजू बडेरे 
(मुख्य संपादक)


जळगाव (जामोद) तालुक्यातील शेतकरी शासन व प्रशासन यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे त्रस्त झालेलो आहोत. त्यामुळे आम्ही कंटाळून सतत तोटयात जाणा-या शेतीमुळे हतबल झालो आहोत. आमच्यापुढे आता स्वतःची किडणी विकण्याशिवाय किंवा शेतीत गांजा
पिक लागवड करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नाही.

१)खरीप सन २०२४ चा पिकविमा मंजुर होवून एका वर्षीपेक्षाजास्त कालावधी झाला तरीही अदयाप शेतक-यांच्या खात्यात पिकविम्याची रक्कम जमा झालेली नाही.

२)शासनाने जाहीर केलेले सोयाबीन व कापसाचे अनुदानाचे हेक्टरी ५००० रू.प्रमाणे अनुदान अजुनही ब-याचशा शेतक-यांच्या खात्यात जमा झालेले नाही.

३)यावर्षी मागील २ महीण्यांपासून सततचा पाउस सूरू असून त्यामुळे कपाशीच्या बोंड्या सडून गळत आहेत व सोयाबीनच्या शेतात पावसाचे पाणी थांबल्यामुळे व सतत चालु असलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा पोकळ राहीलेल्या आहेत. ज्यामुळे उत्पादनात मोठी घट होत आहे.

४) मे २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मका, ज्वारी, भुईमुंग, कांदा व इतर पिकांचे अतोनात नुकसान झालेले असून सूध्दा खेर्डा बु व खेर्डा खुर्द या गावातील पंचनामे होवून ही संबंधीत अधिका-यांनी अहवाल निरंक सादर केल्यामुळे मिळणा-या लाभापासून शेतकरी वंचीत राहीले आहेत.

५ )प्रेषक तहसिल नेळगाव मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या शेतक-यांनी ईकेवायसी करून सूध्दा अदयाप लिपीन त्याच्या खात्यात पैसे जमा करण्यात आलेले नाही.

           वरील सर्व समस्यांनी त्रस्त झाल्यामुळे आम्ही आपणास आमच्या किडण्या विकण्याची व शेतात गांध लागवड करण्याची रितसर परवानगी मागत आहोत जे आपण देवून आमच्या सर्व समस्यांचे निराकासा कराल अशी आशा बाळगतो व सोबतच जळगांव जामोद तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व कर्जद शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी ही सूध्दा या निवेदनाव्दारे आपणास मागणी करीत आहे. सदर मागण्या आठ दिवसांच्या आत मान्य न झाल्यास आपली आमच्या निवेदनास मुक संमती गृहीत धरून पुढील मागाचा अवलंब केल्या जाईल.असे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे